Dec 11, 2011

Marathi Movie Jogwa Story..

Putala is an innocent girl barely 16-17 year old .She is leading a happy, carefree life of a normal, rustic girl. When her life takes an unexpected turn-all because of knots (jat) in her hair. Pulta now has to be dedicated to Goddess Yallamma merely because she has developed knots (jat) in her hair . In case she is dedicated to the Goddess she is in danger of incurring the wrath of Goddess who resides on the mountain of Soundatti. The Goddess’ wrathful curse will destroy the entire family. Putla’s parents are terrified with the circumstances. Ultimately tremoundous social pressures turn Putla into a “Jogtin’ (one who is dedicated to Goddess Yallamma.)

Putla is torn between the pressures inflicted by the worsening economic strains in the family and the jears and mocking stares of the society. The mind comaores the path imposed on her by a superstitious society and the happy settled lives led by her companions. The contradictions sadden her. Restless Putla turns her back on her parents and in face of stiff oppositions from them, joins Raghu’s troupe, which sings the praises of the Goddess for a living. Putla turns a new leaf. At the ame time Tayappa, who is also a member of the same troupe draped in a sari and made a ‘Jogtini’ at the time of Putla’s ceremonial dedication to the Goddess Yallamma, is happy to see Putla in the troupe.

Putla gets attracted to a new entrant in the troupe ‘Annu’ who plays the ‘zanjari’. She is mad with joy when she learns about his plans of settling down in marriage. She gives herself upto Annu. In course of time, she is on the threshold of motherhood. But Annu smashes her dreams of a happy settled life. He rejects the parenthood of the unborn child. Putla is devastated. Again, Tayappa caringly stands to support her.

A dejected Putla returns to her village. Her parents throw her out. Here, Tayappa convinces her to abort the child and encourages her to form their own troupe. Putla then decides to go for an abortion and thereby seeks to start life afresh. She assembles a new dance troupe, without Raghu and Annu. She gets support in her venture from Tayappa. She is horrified when she learns about the tortures heaped on him by his people and the society. Putla senses something different in Tayappa and is enamored by this very quality. Tayappa is also in need on mental support. They come together physically and mentally. Both of them dream for a happy settled life. But their fellowmen belonging to their own sects disapprove such a union. They take Tayappa to the mountains for castrating.

Putal goes for help for help of Tayappa .more sir Who is an activist and Works against irrational rites and traditions , helps her putla gets furious against all the people harassing Tayappa . Putla starts bcating up people by whatever she gets into her hand .Tayappa also joins her. By seeing that atticude off both putla and tayappa, everybody starte running, where ever they find place to run down the mountains.

Finally putla finds a big knife [ koyata ] by which she threatens the pujari and him to marriage rituals between her and Tayppa. Fayally she asks tayappa to remove to his perform marriage rituals between her and . Tayppa to remove his sari and dress like man They both get married in front of all people and starts a new life.

आजीचे बक्षीस!

शिक्षकांच्या "सायबा'विषयी त्या आजींच्या कल्पना वेगळ्याच होत्या. त्यात मी बसतच नव्हतो; पण आजीच्या नातवानेच मी "सायब' असल्याचं सांगितलं, तेव्हा आजींनी मला जे बक्षीस दिलं, ते माझ्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ बक्षीस होतं...

माणसाच्या आयुष्यात त्याला विविध प्रकारची बक्षिसे मिळतात. यामध्ये काही बक्षिसे उच्च पातळीवरील असतात. ही बक्षिसे महत्त्वाच्या व्यक्तीकडून संबंधितास देऊन त्याचा गौरव-कौतुक केले जाते. असेच मला जगातील सर्वश्रेष्ठ बक्षीस मिळाले ते मी अद्याप माझ्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवले आहे.
1971ची गोष्ट. 40 वर्षे पूर्ण झाली. मी उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग येथे ट्रेनिंग कॉलेज (डीएड) मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होतो. विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण करावयाचा असतो. या ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थ्यांना शालाबाह्य व अंतर्गत विषयाचे शिक्षण दिले जायचे. यामध्ये समाजसेवा विषयाचा समावेश होता. योगायोगाने हा विषय माझ्याकडे शिकविण्यास होता. 50 टक्के फिल्डवर्क व 50 टक्के अंतर्गत काम असे या विषयाचे स्वरूप होते. पूर्वी सातवी व अकरावी पास विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षकांची नोकरी मिळत असे. या शिक्षकांना दोन वर्षांचे डीएडचे ट्रेनिंग पूर्ण करण्याचे बंधन होते, म्हणून सरकारने या शिक्षकांना डेप्युटेशनवर ट्रेनिंगसाठी पाठविलेले असायचे. सरासरी 30 वर्षांपुढील शिक्षक (विद्यार्थी) ट्रेनिंगसाठी असायचे. या शिक्षकांचा शिक्षक म्हणून मी विसाव्या वर्षी इथे सुरवात केली. या वेळी सर्वांत मीच लहान दिसायचो.

या ट्रेनिंगदरम्यान दोन वर्षांतून एक वेळ कॉलेज परिसर सोडून सात दिवस बाहेर परगावी समाजसेवा करण्यासाठी शिक्षकांना (विद्यार्थ्यांना) घेऊन जायचे असते. प्रत्येक प्राध्यापकाकडे 15 ते 20 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप असायचा. असाच एक ग्रुप घेऊन मी सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावात गेलो होतो. तिथे आमचा सात दिवस मुक्काम होता. याच गावातील एक विद्यार्थी (प्रा. शिक्षक) माझ्या ग्रुपमध्ये होता. त्याने आम्हा सर्वांना चहा पिण्याचे निमंत्रण दिले. म्हणून आम्ही सर्वजण त्या शिक्षकाच्या घरी चहा पिण्यास गेलो. घर प्रशस्त होते. सर्वसाधारण रात्रीचे सात वाजले होते. खेड्यात वीज नसल्याने आम्हाला एकमेकांचे चेहरे नीट दिसत नव्हते. संबंधित शिक्षकाच्या घरी आम्ही सर्वजण कंदिलाच्या उजेडात भिंतीला टेकून गोलाकार बसलो होतो. यामध्येच मी एका ठिकाणी बसलो होतो. चहाला वेळ होता म्हणून मी सर्व शिक्षकांना सात दिवसांचे नियोजन लिहिण्यास सांगून मीही लिखाण करीत बसलो. प्रत्येक जण आपआपल्या कामात होता. दरम्यान, आम्ही ज्या शिक्षकाच्या घरी गेलो होतो, तिथे त्याची वयस्कर आजी होती. या आजीची उत्सुकता ताणली होती, की या सर्व शिक्षकांचा "सायब' कोण? ती त्या घराच्या चौकटीतून सारखी आमच्याकडे डोकावून बघत होती. सर्वसाधारण चौकटीपासून मी तसा लांबच बसलो होतो. आजीला कोडे पडले होते, की या सर्व शिक्षकांचा सायब लय मोठ्ठा असेल. त्याला मोठं पोट असेल, भल्या मोठ्या मिशा असतील, दिसायला राकट असेल, या दृष्टिकोनातून ती आमच्याकडे भिरभिरत्या नजरेने बघत होती; पण तिच्या मनातला "सायब' तिला आमच्यात कोठेच दिसत नव्हता. शेवटी तिने तिच्या नातवाला (शिक्षकाला) बोलविले व विचारले, ""तुझा सायब कोणता रं?'' त्या शिक्षकाने माझ्याकडे बोट करून दाखविले, ""आजी, हे आमचे साहेब.''
आजी क्षणाचाही विलंब न करता तरा तरा चालत माझ्याजवळ आली आणि आम्हा सर्वांना कळायच्यात त्या माउलीने तिचे दोन्ही राकट हात माझ्या दोन्ही गालांवर फिरवून बोटे स्वत:च्या कानशिलावर कडाकडा मोडली व म्हणाली, ""एवढ्या लहान वयात शिक्षकांचा सायब झालास, धन्य तुझे आईवडील.'' एवढी बोलली अन्‌ निघून गेली. माझ्या अंगावर कौतुकाचे रोमांच उभे राहिले. सर्व शिक्षक माझ्याकडे कौतुकाने पाहात राहिले होते. हेच माझ्या आयुष्यातील ""सर्वश्रेष्ठ बक्षीस'' होय.

डर्टी पिक्‍चर

"डर्टी पिक्‍चर'साठी मी माझे जवळचे नातेवाईक व मित्र-मैत्रिणींपासूनही दूर झाले. अनेकांच्या टेक्‍स्ट मेसेज-व्हिडिओ मेसेजमुळे मी डिस्टर्ब होत होते. भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला मी तयार आहे, पण टीका हीन पातळीवर जाऊ नये. ती कामाशी सुसंगत असावी...आपला अभिनयप्रवास सांगतेय प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन...

मुंबईच्या चेंबूर उपनगरात दक्षिण भारतीय कुटुंबात मी वाढले. अम्माने लाड केले पण त्याबरोबर शिस्तही लावली. लहानपणी स्वप्नं, महत्त्वाकांक्षा असं काहीच नव्हतं. मी खुशालचेंडू मुलगी होते. मुंबईच्या प्रसिद्ध सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये मी कलाशाखेत प्रवेश घेतला. दरम्यान, एकता कपूरने तिच्या "हम पॉंच' मालिकेसाठी माझी निवड केली. माझ्या कुरळ्या केसांच्या काहीशा वेगळ्या दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी तिने मला निवडलं होतं. "हम पॉंच'मधील राधिका माथूर ही व्यक्तिरेखा मी केलीये, हे आता सांगून खूपजणांना कदाचित खरं वाटणार नाही. असो. माझी आणि एकता कपूरची मैत्री तेव्हापासूनची आहे. माझ्या अभिनयक्षेत्रातल्या प्रवासाला तिथेच सुरुवात झाली.

त्यानंतर कॉलेजमध्येच माझी भेट झाली ती प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर प्रदीप सरकार यांच्याशी. त्यांनी आमच्या कॉलेजमधल्या काहीजणांची ऍड फिल्मसाठी निवड केली. मलाही त्यात संधी मिळाली होती. ऍड फिल्ममधलं माझं काम बघून त्यांनी "परिणीता' चित्रपटासाठी मला विचारलं. या चित्रपटात ललिता ही मध्यवर्ती भूमिका मिळणार म्हणून मी खूषच झाले होते. पण प्रदीपजींनी केलेली माझी निवड विधू विनोद चोप्रांनी नाकारली. त्यांना सुंदर, ग्लॅमरस, आकर्षक अशा चेहऱ्याची व अभिनयाची जाण असणारी आणि नवीन फ्रेश चेहऱ्याची मुलगी हवी होती. माझं कुरळ्या केसांचं अनाकर्षक ध्यान चोप्रांसारख्या तद्दन फिल्मी दिग्दर्शकाला कसं पसंत पडावं? पण हे आव्हान प्रदीप सरकारांनी स्वीकारलं. माझा मेकओव्हर सुरू झाला. सर्वप्रथम कुरळ्या-राठ केसांना सरळ करण्याची किचकट प्रोसेस चक्क 7-8 तास चाले. माझ्या केसांना सरळ केल्यानंतर ते बंगाली पद्धतीनं स्टाइल करण्यात येत. बंगाली साड्या, सिंदूर, गेटअप असा सगळा जामानिमा केल्यावर माझे अनेक फोटो शूट्‌स केल्यानंतर ते चोप्रांकडे दाखवण्यात येत असत. अशा तब्बल 40 सिक्रेट टेस्ट्‌स व 17 मेकअप शूट्‌स मला करावे लागले. अशा भयंकर कंटाळवाण्या परिस्थितीतून गेल्यानंतर मला ती भूमिका करण्याची संधी मिळाली. पहिल्यावहिल्या भूमिकेसाठी मला खूपच परिश्रम करावे लागले.
"परिणीता'च्या यशानंतर माझ्यावर अनेक पुरस्कारांचा पाऊस पडला, अनेक ऑफर्स आपोआप चालत आल्या. "हे बेबी', भूलभुलैय्या, किस्मत कनेक्‍शन, सलाम-ए-इश्‍क, लगे रहो मुन्नाभाई, हल्लाबोल, नो वन किल्ड जेसिका असे चित्रपट मी त्यानंतर केले. त्यातले बहुतेक यशस्वीही झाले. या यशाच्या प्रवासात टीकेची जोड नेहमीच राहिली, ज्याचं मला खूप वाईट वाटतं.

"परिणीता' केल्यावर माझं नाव प्रदीपजींशी जोडलं गेलं. त्यानंतर माझ्यावर टीका झाली ती मला ड्रेस सेन्स नसल्याची, जी अजूनही होते. "हे बेबी' चित्रपटात माझे ड्रेस खरं तर मनीष मल्होत्रासारख्या नामी डिझायनरने केले. तरीही त्या आऊटफिट्‌सवर प्रचंड टीका झाली. मला जे ड्रेस दिले गेले ते मी आज्ञाधारकपणे घातले. त्यात मला ड्रेसिंग सेन्स नसल्याचा आरोप म्हणजे टू मच होता. माझ्या वाढत्या वयाचा- शरीरयष्टीचा उल्लेख रेडिओ जॉकींनीही करायला आरंभ केला. माझा उल्लेख विद्या बालन असा न होता विद्या आंटी असाच हटकून होऊ लागला. कुठून मी या व्यवसायात आले असं झालं. उद्रेकाच्या भावना मनात क्षणोक्षणी डोकं वर काढत राहिल्या, पण कारकिर्दीची गाडी पुढे पुढे जात राहिली. पुढे "पा' चित्रपट मिळाला. इश्‍किया व पा या चित्रपटांनी मला उत्तम अभिनेत्री म्हणून नामांकनं-पुरस्कार मिळवून दिले. या पुरस्कारांनी-आई वडील व बहिणीच्या शाबासकीने नवी उमेद मिळत गेली. पुढची वाटचाल सुकर होत गेली.

एकता कपूर व दिग्दर्शक मिलन लुथ्रिया यांनी मला "डर्टी पिक्‍चर' चित्रपटात सिल्क स्मिताची भूमिका देऊ केली तेव्हा मला धन्य वाटलं होतं. कारण एका वादग्रस्त अभिनेत्रीचा जीवनप्रवास पडद्यावर साकारणं खूपच जिकिरीचं-मेहनतीचं व आव्हानात्मक होतं. सिल्क स्मितासारख्या अभिनेत्रीची बॉडी लॅंग्वेज दाखवण्यासाठी माझं वजन-शरीर मला वाढवावं लागेल हे मला सांगण्यात आलं. पण मी प्रॉस्थेटिक मेकअपचा आधार घेत पडद्यावर धष्टपुष्ट दिसले. "डर्टी पिक्‍चर'साठी मी माझ्या जवळच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणींपासूनही दूर झाले. माझ्या ब्लॅकबेरी फोनमधील मेसेंजर हा ऑप्शन तब्बल 4 महिने बंद ठेवला. कारण अनेकांच्या टेक्‍स्ट मेसेज-व्हिडिओ मेसेजमुळे मी डिस्टर्ब होत होते. भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला मी तयार आहे. कलाकाराचं ते कर्तव्यच आहे. पण टीका हीन पातळीवर जाऊ नये. ती कामाशी सुसंगत असावी. कलाकाराचं मनोधैर्य खचेल अशी नसावी इतकंच.

अशी मी...

* नाव : विद्या बालन
* घरगुती नाव : विद्याच. कधी तरी बहीण मला प्रेमाने विड्‌स म्हणते.
* एका शब्दात मी : उत्स्फूर्त, उत्साही. हो, मला राग येतो तोंडपुज्यांचा.
* आवडतं पुस्तक : द मंक हू सोल्ड हीज फेरारी.
* आवडती डिझायनर : सब्यसाची मुखर्जी
* आवडती वेशभूषा : आय लव्ह सारीज. सध्या 555 इंडियन एथनिक साड्या माझ्या संग्रही आहेत.
* आवडतं सौंदर्य प्रसाधन : काजळ आणि फक्त काजळ...
* आवडती डिश : साऊथ इंडियन फूड : सांबार-भात, रस्सम-भात.
* अभिनेत्री नसते तर : समाजशास्त्रज्ञ झाले असते.. किंवा लेखक.
* एक वाईट सवय : मला रात्री लवकर झोप लागत नाही. किंवा झोप लागतच नाही म्हटलं तरी चालेल.
* भय वाटतं : टीकेचं- अंधारातल्या सावल्यांचं.
* प्लस पॉइंट : माझा प्रामाणिकपणा.
* प्लॅटिनम ज्वेलरीबद्दल : प्लॅटिनम ज्वेलरी मला आवडते. तसे सगळेच दागिने आवडतात. कार्यक्रमांमध्ये हेवी ज्वेलरी वापरायला मला आवडते.